जिथे सर्वसामावेशक विकास घडलेला असेल,
जिथे शेतकरी समाधानी असतील,
जिथे सर्वसामान्यांपर्यंत सोयीसुविधा पोहोचलेल्या असतील,
जिथे गुंडागर्दीला जागा नसेल,
जेथील युवा सुशिक्षित व उद्योगशील असेल,
जेथील महिला सुरक्षित असून त्यांची रोजगाराभिमुख दिनचर्या असेल,

जिथे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीचा आनंद घेऊ शकतील,
जेथील वातावरण हे नेहेमी शांत, विकासाभिमुख, सर्वसामावेशक असेल
असा माझा अहमदनगर जिल्हा मला बनवायचाय.
हेच माझे स्वप्न आहे,
हे सर्व अहमदनगरवासियांचे स्वप्न आहे.

शपथ
आम्ही शपथ घेतो की,
आम्ही अहमदनगरवासीय आमच्या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वात विकसित जिल्हा बनवू,
सर्व समाज्यातील लोक एकत्र येऊन सर्वसामावेशक विकासाला हातभार लावू,
जिल्ह्यामध्ये विकासाभिमुख वातावरण राखण्यास मदत करू,
आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील यासाठी नेहेमी प्रयत्नशील राहू.
