fbpx

Author: sujay

अस्तगांव येथे तळ्याचे जलपूजन करताना विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील.

अस्तगांव येथे तळ्याचे जलपूजन करताना विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. Featured

अहमदनगर जिल्याच्या राजकीय, सामाजिक, शॅक्षणिक, आणि सहकार क्षेत्रात एक या नात्याने मी कायरत आहे. सहकार चळवळी जनक पदमश्री दर. विठ्ठलराव विखे पाटील व माझे आजोबा पदमभूषण Dr. बाळासाहेब विखे पाटील याच्या विचाराचा वारसा घेऊन, मी सामाजिक बांधिलकीने जिल्यातल्या काम करत आहे विरोधी पक्षनेते मा. राधाकुष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ शालिनीताई विखे पाटील याचे बहुमोल असे मार्गदर्षन माझ्या या सामाजिक राजकीय कार्याला मिळत आहे.

पदमश्री Dr. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन या नात्याने काम पाहत असताना सहकार चळवळ जिवंत राहावी म्हणून, जिल्यात बंद पडलेला गणेश सहकारी साखर कारखाना आणि Dr. तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यास घेऊन, या दोन्हीहि तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱयाच्याना दिलासा देण्यात मी प्रयत्न केला आहे
अहमद नगर येथे पद्मश्री dr. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन च्या माध्यमातून शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील विध्यठांना प्राप्त करून दिल्या असून या भागात विविध तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिरांचे आजोजन करून, ग्रामीण भागातील रुग्णांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आपण व्यक्तीशी प्रयत्नकरीत आहोत आजपरियंत आशा पद्धतींत शिबिरे आजोजित केली असून या माध्यमातून हजार रुपयाची आरोग्य तपासणी करण्यात आलीय.

अहमदनगर जिल्हा हा जिरायती पट्ट म्हणून ओळखली जाते या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते .जिल्ह्यात आपण लोकसहभागातून जलक्रांती अभियान राबवले .या माध्यमातून गावपातळीवर असलेले जुने नाले पुनः जीवित करून, त्यात पाणी साठवले जाते याचा लाभ संबंधित गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी झाला हे मला अभिमानाने नमूद करावे वाटते.

शेती क्षेत्रात असलेल्या अपयशामुळे जिल्ह्यात दोनशे आठ कुटुंबिये विखे पाटील परिवाराने दत्तक घेतलीअसून या परिवारातील विद्याथ्यांची शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा विवाह साठी मदत करण्यात येत आहे देश पातळी वर असा उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकीणजपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोफत अपघात विमा योजनेचा हा उपक्रम नगर जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे आतापरीयंत एक लाख पन्नास हजार नागरिकांचा विमा उतरवण्यात आला असून, या विम्याची रक्कम जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे आतापरीयंत एकशे दोन कुटुंबियांना दोन कोटी रुपयांचा विम्याचा लाभ मिळूनदीला आहे.

विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अहमदनगर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याची विकासाची कामे सध्या सुरु असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांच्या माध्यमातून या विकासाच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या बरोबर व्यक्तिशः माझाही पाठपुरावा सातत्याने चालू असतो. पक्षीय स्तरावर संघटात्मक बांधणी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शना खाली आणि यौवक काँग्रेस कार्यकर्त्याच्या साहाय्याने साततयाने सुरु आहे अपंपहीलेच आहे, हेच पक्षीय काम पुढे घेऊन जाण्यासाठी आपण मला अधिक संधी दिली तर माझ्या कमला प्रोत्साहन मिळेल असा मला विश्वास वाटतो. आपण मला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून पक्षातर्फे उमेदवारीची संधी द्यावी हि विनंती.
सोबत मी केलेल्या कार्याचा कार्य वृत्तांत आपल्याला सादर करीत आहे.
कळावे.